Dhirubhai Ambani Birthday : जेंव्हा धीरूभाईंनी शेअर बाजारातील दलालांना गुडघे टेकायला लावले!

70 आणि 80 च्या दशकात, एका माणसाने शेअर बाजाराचा पूर्ण गेम बदलला. या व्यक्तीचे नाव होते धीरूभाई अंबानी.
Dhirubhai Ambani Birthday
Dhirubhai Ambani BirthdaySakal

Dhirubhai Ambani Birthday : ही त्या काळची गोष्ट आहे जेव्हा लोक शेअर बाजारात लाभांशासाठी गुंतवणूक करत असत,. बहुतांश कंपन्यांचे उद्दिष्ट नफा कमावणे होते आणि या नफ्याच्या बदल्यात भागधारकांना लाभांश मिळत असे.

70 आणि 80 च्या दशकात, एका माणसाने शेअर बाजाराचा पूर्ण गेम बदलला. या व्यक्तीचे नाव होते धीरूभाई अंबानी. अंबानी कोणत्याही परिस्थितीत आपल्या शेअर्सची किंमत कमी होऊ द्यायला तयार नव्हते. याचा परिणाम म्हणून 90 च्या दशकाच्या अखेरीस 24 लाख गुंतवणूकदार रिलायन्समध्ये सामील झाले होते.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी संपूर्ण स्टेडियम बुक करावे लागले. रिलायन्स म्हणजे फायदेशीर करार. गुंतवणूकदारांचा इतका विश्वास होता की लोक त्यांच्या ठेवी घेऊन रिलायन्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी पोहोचायचे.

याचे एक कारण म्हणजे रिलायन्सची अहोरात्र प्रगती होत होती. त्याच वेळी, एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे धीरूभाई अंबानी रिलायन्सला शेअर बाजाराच्या खेळापासून कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठेवायचे.

1977 मध्ये जेव्हा रिलायन्सने पहिला IPO जारी केला. हा IPO 7 पट दराने ओव्हरसबस्क्राइब झाला. 1982 पर्यंत रिलायन्सचा शेअर 131 रुपयांवर पोहोचला होता. मग त्याच वर्षी मार्च महिन्यात असे काही घडले, ज्यामुळे धीरूभाई शेअर बाजाराचे मसिहा बनले.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

धीरूभाईंनी शेअर बाजारातील दलालांचा केला पराभव :

तारीख होती 18 मार्च 1982. हा दिवस स्टॉक एक्स्चेंजमध्ये हाहाकार माजवणार होता. त्याचे असे झाले की कलकत्त्याच्या काही स्टॉक ब्रोकर्सनी रिलायन्सचे शेअर्स पाडायला सुरुवात केली. स्टॉकच्या भाषेत अशा लोकांना अस्वल म्हणतात.

हे लोक किंमत कमी करून पुन्हा शेअर्स खरेदी करून नफा कमावतात. याउलट, जे शेअर्स विकत घेऊन त्यांची किंमत वाढवतात आणि नंतर जास्त किंमतीला विकून नफा मिळवतात, त्यांना इंग्रजीत 'बुल्स' म्हणतात. दलालांची रिलायन्सचे शेअर्स खाली आणण्याची योजना होती. आणि हे करण्यासाठी ते फ्युचर्स ट्रेडिंगचा वापर करणार होते.

फ्युचर्स ट्रेडिंग म्हणजे शेअर्खची तोंडी खरेदी आणि विक्री . फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये ब्रोकरकडे शेअर्स नसतात. ते फक्त वचन देतात की ते ठराविक दिवशी शेअर्स विकतील किंवा खरेदी करतील. यामध्ये असाही नियम आहे की, ठरलेल्या वेळी पैसे भरण्यास उशीर झाल्यास प्रति शेअर 50 रुपये द्यावे लागतील.

त्या दिवशी असे काही घडले की, स्टॉक एक्सचेंज उघडताच रिलायन्सचा शेअर 131 रुपयांवरून 121 रुपयांपर्यंत घसरला. या बुडत्या स्टॉकमध्ये कोणताही प्रगत गुंतवणूकदार पैसे लावणार नाही, अशी दलालांना आशा होती.

Dhirubhai Ambani Birthday
Dhirubhai Ambani Birth Anniversary : दत्तगुरुंचीच कृपा समजून धीरुभाईंनी गिरनारच्या पायथ्याला सुरू केला पहिला स्टार्टअप!

त्यामुळे रिलायन्सच्या गुंतवणूकदारांमध्ये चेंगराचेंगरी होईल आणि शेअर घसरत जाईल. कंपनी स्वतःचे शेअर्स स्वतः विकत घेऊ शकत नाही असाही नियम होता. त्यामुळे रिलायन्सचे बुडणे निश्चित होते. धीरूभाई अंबानी इतक्या सहजासहजी हार मानणार नव्हते.

शेअर्स घसरल्याची बातमी धीरूभाईंना मिळताच त्यांनी तत्काळ 'बुल' दलालांशी संपर्क साधला. बुल मार्केटमध्ये उडी घेतली. आणि इथूनच बुल आणि बीयर्स यांच्यात युद्ध सुरू झाले. एकीकडे कलकत्त्यात बसलेले बेअर रिलायन्सचे शेअर्स विकत होते तर दुसरीकडे बुल्स विकत घेत होते.

या भांडणाचा परिणाम असा झाला की दिवसअखेरीस हा शेअर रु.125 च्या भावावर थांबला. दुसर्‍या दिवशीही हीच रस्सीखेच सुरू होती. या सामन्यात धीरूभाईंना जिंकणे आवश्यक नव्हते. फ्युचर्स ट्रेडिंगच्या काळात शेअर्स जास्त बुडणार नाहीत याची खात्री त्यांना करायची होती.

कारण सराफांच्या अपेक्षेप्रमाणे जर स्टॉकमध्ये घसरण झाली नाही, तर आठवड्याच्या अखेरीस त्यांना आश्वासनानुसार शेअर्सचे पैसे द्यावे लागतील.

पुढचे काही दिवस बुल मार्केटने मोठ्या प्रमाणात शेअर्स खरेदी केले. काही दिवसांतच रिलायन्सचे 11 लाख शेअर्स विकले गेले आणि त्यापैकी सुमारे साडेआठ लाख शेअर्स अंबानींच्या दलालांनी विकत घेतले. खेळ संपला तोपर्यंत शुक्रवार होता.

आता कलकत्त्यात बसलेल्या दलालांचे भान हरपले होते. कारण 131 ला विकले गेलेले शेअर तो खूप कमी किमतीत विकत घेईल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र शुक्रवारपर्यंत शेअरचा भाव 131 च्या वर पोहोचला.

Dhirubhai Ambani Birthday
पेट्रोल पंपावर 300 रुपयांची नोकरी ते रिलायन्स सम्राट; असा आहे धीरूभाईंचा प्रवास

याचा अर्थ असा होता की, आता बेअरना शेअर्सची परतफेड करण्यासाठी जास्त किंमतीला शेअर्स खरेदी करावे लागले. दुसरीकडे, जर त्याने शेअर्सचे पैसे दिले नाहीत तर त्याला प्रति शेअर 50 रुपये द्यावे लागतील.

बेअरनी बुलकडे वेळ मागितला. पण त्यांनी नकार दिला. शेअर बाजाराच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण बुलतयार नव्हते. धीरूभाईंना बेअर्सला चांगला धडा शिकवायचा होता.

त्यामुळे पुढचे 15 दिवस रिलायन्सचे शेअर्स ज्या किमतीत उपलब्ध असतील, ते विकत घेतले गेले. परिस्थिती अशी बनली की तीन दिवस शेअर बाजार उघडताच बंद झाला. रिलायन्सच्या गुंतवणूकदारांनी प्रचंड नफा कमावला.

10 मे 1982 पर्यंत रिलायन्सचा शेअर गगनाला भिडला होता. धीरूभाई अंबानी हे शेअर बाजाराचे मसिहा बनले आणि रिलायन्स टेक्सटाईल इंडस्ट्रीज ही गुंतवणूकदारांसाठी सोन्याची अंडी देणारी कंपनी बनली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com