लॉकडाऊन वाढवल्यामुळे अर्थव्यवस्थेबरोबरच वैद्यकीय संकटही निर्माण होईल : आनंद महिंद्रा

लॉकडाऊन वाढवल्यामुळे अर्थव्यवस्थेबरोबरच वैद्यकीय संकटही निर्माण होईल : आनंद महिंद्रा

सद्य परिस्थितीत लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळे फक्त आर्थिक संकटच निर्माण होणार नाही तर त्यामुळे वैद्यकीय संकटसुद्धा निर्माण होईल, असे मत महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले आहे. कोरोना महामारीमुळे सध्या देशभर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आनंद महिंद्रा यांनी आपले मत मांडले आहे.

सध्या सरकारसमोर असलेले पर्याय सोपे नाहीत. मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढवून हाती काही येणार नाही, असे मत पुढे महिंद्रा यांनी व्यक्त केले आहे.
लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळे देशासमोर फक्त आर्थिक संकटच उभे ठाकणार नाही तर आणखी एक वैद्यकीय संकटदेखील उभे राहील, असे आपण आधीदेखील टविट केल्याचे महिंद्रा यांनी म्हटले आहे.

'लॉकडाऊनचे भयानक मानसिक परिणाम आणि बिगर कोविड रुग्णांकडे दुर्लक्ष होण्याची मोठी जोखीम', या लेखाकडे लक्ष वेधत महिंद्रा यांनी वरील परखड मत व्यक्त केले आहे. याआधी महिंद्रा यांनी ४९ दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व कामकाज पूर्ववत करण्याची सूचना केली होती. सरकारसमोर असलेले पर्याय अवघड आहेत, मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढवून फारसे काही साध्य होणार नाही, असे महिंद्रा यांनी म्हटले आहे.

देशातील कोविड-१९च्या रुग्णांची संख्या वाढतच जाणार आहे. आपले लक्ष देशभरातील हॉस्पिटल आणि त्यातील खाटांची संख्या वाढवण्यावर असले पाहिजे. जास्तीत वेंटिलेटर आणि वैद्यकीय सेवा उभी करण्यावर आपण भर दिला पाहिजे. आपल्या लष्कराकडे यासंदर्भात मोठी क्षमता आहे, असेही पुढे महिंद्रा म्हणाले.

२२ मार्चला सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर कोविडमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीसंदर्भात महिंद्रा यांनी चिंता व्यक्त केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com