अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : देशाचे सुरक्षा कवच अधिक मजबूत होणार असून, जवानांसाठी वन रँक वन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. अर्थसंकल्पादरम्यान देशाचे सुरक्षा कवच अधिक मजबूत होण्यावर भर देण्यात आला आहे.
हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज (शुक्रवार) लोकसभेत मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला.
या अर्थसंकल्पादरम्यान गोयल यांनी विविध क्षेत्रात घोषणांचा पाऊस पाडला. चीन आणि पाकिस्तानकडून सातत्याने मिळत असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षण क्षेत्रासाठी तब्बल 3 लाख कोटींहून अधिक तरतूद केली आहे.
यावेळी पीयूष गोयल यांनी जवानांसाठी वन रँक वन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे, असे सांगत संरक्षण क्षेत्राला 3 लाख कोटी रुपये देण्याची घोषणा केली. गेल्या 2018च्या अर्थसंकल्पाच संरक्षण क्षेत्रासाठी मोदी सरकारने सुमारे 2 लाख 95 हजार कोटींची भरीव तरतुद केली होती. ही रक्कम बजेटच्या एकूण रकमेच्या सुमारे 12.10 टक्के इतकी होती.
दरम्यान, मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर 2014-15 मध्ये सरकारने संरक्षणासाठी 2 लाख 29 हजार कोटी रूपयांची तरतूद केली होती. संरक्षण अर्थसंकल्पात ही 10 टक्क्यांची वाढ होती. 2015-16 मध्येही 10 टक्क्यांच्या वाढीसह संरक्षणासाठी 2 लाख 46 हजार रूपयांची तरतूद करण्यात आली. 2016-17 मध्ये संरक्षण अर्थसंकल्पात 9.3 टक्क्यांची वाढ करण्यात आली. 2016-17 मध्ये संरक्षण क्षेत्रासाठी 2 लाख 74 हजार रूपये देण्यात आले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.