कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्षात उत्पादनात 2 लाख कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India (RBI) ) व्यक्त केला आहे.
मुंबई- कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्षात उत्पादनात 2 लाख कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India (RBI) ) व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकने पहिल्यांदाच अशाप्रकारचा अभ्यास केला आहे. असे असले तरी या नुकसानीचा थेट परिणाम जीडीपीवर होणार नाही, पण अर्थव्यवस्थेच्या मुल्यवर्धनाला याचा फटका बसेल असं आरबीआयने सांगितलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (Second Covid wave may leave Rs 2 lakh crore dent on economic output RBI)
2020 च्या सुरुवातीपासून सर्व जगावर कोरोना महामारीचं संकट थैमान घालत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवरही कोरोना महामारीचे दुरगामी परिणाम झाले आहेत. भारतीय जीडीपीमध्ये घट झाली आहे, तसेच जीडीपीच्या विकासाचा दरही चिंता वाढवणारा आहे. आरबीआयच्या उत्पादन तोट्याचे परिणाम अंदाजित जीडीपीवरही पाहायला मिळाले. आरबीआयच्या ताज्या आर्थिक धोरणानुसार जीडीपीचा विकास दर 10.5 टक्क्यांवरुन 9.5 टक्के होण्याचा अंदाज आहे. पहिल्या आर्थिक तिमाहीत जीडीपीमध्ये 18.5 टक्क्यांची वाढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
अधिक माहिती देताना केंद्रीय बँकेने सांगितलं की, बँकेत पैसे जमा न करण्याचा दर वाढला आहे. याचा अर्थ कोरोना महमारीत लोकांची बचत कमी झाली आहे. लोकांकडे असलेल्या संपत्तीतही 1.7 टक्क्यांची घट झाली आहे. लोकांचा कोरोना महामारीवरील उपचारावरील खर्च वाढला आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत लोकांवर गंभीर आर्थिक परिणाम झाले आहेत. पण, येत्या काळात यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. कोरोना निर्बंध हटवण्यात आल्याने उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत. शिवाय लसीकरणाचा सकारात्मक परिणाम पाहिला मिळण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एम डी पात्रा म्हणाले की, लोकांमध्ये हर्डइम्युनिटी तयार होईल आणि पुन्हा आर्थिक चक्र सुरळीत होण्याची आशा आहे. अंदाजानुसार सप्टेंबर 2021 पर्यंत 70 कोटी लोकांना लस देण्यात येईल. हे लक्ष्य गाठण्यासाठी दररोज 93 लाख लोकांचे लसीकरण करण्याची आवश्यकता आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.