१२ वर्षांनंतर जगन्नाथाची मूर्ती बदलताना का बांधली जाते पुजाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी?

१२ वर्षातून एकदा मूर्ती बदलताना तेथील पुजाऱ्याच्या डोळ्यावर का बांधली जाते पट्टी ते जाणून घेऊया.
Jagannath Rath Yatra 2022
Jagannath Rath Yatra 2022esakal

जगन्नाथ रथयात्रा १ जुलै २०२२ म्हणजे आजपासून सुरू झाली आहे. जगन्नाथ पुरी धाम हे पृथ्वीचे वैकुंठ मानले जाते. जगन्नाथ पुरीही भगवान विष्णू, त्यांचा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांचा अवतार असलेल्या जगन्नाथजींची लीला भूमी आहे.दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला जगन्नाथ रथयात्रा काढली जाते. ही रथयात्रा सुरु झाली की भगवान जगन्नाथ यांच्यासह बहीण सुभद्रा आणि भाऊ बलभद्र रथावर बसून नगर भ्रमंती करतात अशी लोकांची श्रध्दा आहे.

जगन्नाथ पुरी मंदिराची अशी अनेक रहस्ये आहेत जी आजपर्यंत कोणीही सोडवू शकले नाहीत. भाविक आजही असे मानतात की येथे बसलेल्या जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये आजही श्रीकृष्णाचे हृदय धडधडते. यामागचे रहस्य काय आहे आणि १२ वर्षातून एकदा मूर्ती बदलताना तेथील पुजाऱ्याच्या डोळ्यावर का बांधली जाते पट्टी ते जाणून घेऊया.

Jagannath Rath Yatra 2022
Jagnnath Rath Yatra 2022: आजपासून जगन्नाथ रथ यात्रेला सुरूवात, भक्त पाहोचले जगन्नाथपुरी

श्रीकृष्णाच्या हृदयाचे काय आहे रहस्य?

पौराणिक कथेच्या मान्यतेनुसार भगवान श्री विष्णूंचा जन्म द्वापार युगात श्रीकृष्णाच्या रूपात झाला होता. कारण श्रीकृष्णाचा जन्म मानव रूपात झाला होता, त्यांचा मृत्यू निसर्ग नियमानुसार निश्चित होता. श्रीकृष्णाने देह त्याग केला तेव्हा पांडवांनी त्यांचे अंतिम संस्कार केले. यादरम्यान एक आश्चर्यकारक घटना घडली. श्रीकृष्णाचे संपूर्ण शरीर पंचत्वात विलीन झाले, परंतु त्याचे हृदय धडधडत राहिले.

१२ वर्षानंतर मूर्ती बदलताना कोणती खबरदारी घेतली जाते?

असे मानले जाते की आजही श्रीकृष्णाचे हृदय जगन्नाथजींच्या मूर्तीमध्ये सुरक्षित आहे. भगवंताच्या हृदयाच्या या भागाला ब्रह्म पदार्थ म्हणतात. मंदिराच्या परंपरेनुसार दर १२ वर्षांनी मंदिरातील मूर्ती बदलली जाते, तेव्हा जुन्या मूर्तीतून हा ब्रह्म पदार्थ काढून नवीन मूर्तीमध्ये स्थापित केला जातो. या दरम्यान अनेक कठोर नियमांचे तंतोतंत पालन करावे लागते.

नवीन मूर्ती बसवल्यावर लगेच मंदिराभोवती अंधार केला जातो. तसेच हे कार्य करणाऱ्या पुजाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते आणि हाताला कापड गुंडाळले जाते. असे म्हणतात की ज्याने हा विधी डोळे उघडून पाहिला त्याचा पुढच्या काही दिवसात मृत्यू होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com