Pitru Paksha : आपण अर्पण केलेले अन्न पितरांना मिळत कसं? धर्म अभ्यासक सांगतात

Pitru Paksha : आपण अर्पण केलेले अन्न पितरांना मिळत कसं? धर्म अभ्यासक सांगतात
Updated on

Pitru Paksha 2022 : पितृपक्ष सुरु झाला असून या पितृपंधरवड्यात पितरांसाठी श्राद्धादी कर्म केले जातात. या काळात पितरांसाठी परंपरेनुसार अन्न शिजवले जाते व त्याचा नैवेद्य पितरांना दाखविला जातो. मात्र आपण पृथ्वीवर अर्पण केलेले अन्न आपल्या पितरांना कसे प्राप्त होईल असा प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नाचे उत्तर आपण धर्म अभ्यासकांच्या मते जाणून घेऊया.

Pitru Paksha : आपण अर्पण केलेले अन्न पितरांना मिळत कसं? धर्म अभ्यासक सांगतात
Pitru Paksh 2022 |...या कारणामुळे श्राद्धाला भाताचे पिंड बनवतात

पितरांपर्यंत अन्न पोहचते कसे...?

पितृपक्षात पितरांचे स्मरण करण्यासाठी पितृपंधरवड्यात श्राद्धादी कर्म केले जातात. या काळात पितरांना अर्पण केलेले अन्न पितरांपर्यंत कसे पोहचते यावर धर्म अभ्यासक पं. नरेंद्र धारणे सांगतात, पितर दोन प्रकारचे असतात मृत पितर आणि अमृत पितर. अमृत पितरांमध्ये यम, सूर्य यांसारख्या देवता असतात. आपण जे अन्न देतो ते अन्न मान्य करून घेण्याची देवतांना शक्ती असते म्हणून आपण देवाला एरवी नैवेद्य दाखवतो. आता पितृ पक्षातला नैवेद्य एकदा अमृत पितरांना मिळाला कि ते तो मृत पितरांना म्हणजे आपले मृत आई वडील किंवा नातेवाईक यांना प्राप्त करून देतात. जस आपण बँकेत भारतातून रुपये भरले की अमेरिकेला जाऊन त्याचे डॉलर्स रुपी पैसे आपल्याला मिळतात त्याप्रमाणे.

Pitru Paksha : आपण अर्पण केलेले अन्न पितरांना मिळत कसं? धर्म अभ्यासक सांगतात
Sarva Pitru Amavasya: सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी कोणते 12 श्राद्ध घातले जातात?

एका व्यक्तीने केलेल्या श्राद्धाच पुण्य कुटुंबातील इतर सदस्यांना मिळेल का?

या प्रश्नावर पं. धारणे सांगतात, ज्या प्रमाणे आपल्या घरी सत्यनारायण करायला गुरुजी येतात. ते आपल्या वतीने मंत्र म्हणतात, पण सत्यनारायणाचा पुण्य आपल्याला मिळतच ना.. कारण आपण व त्या गुरुजींनी तशी प्रार्थना देवाला केलेली असते. आपल्या पितरांचे स्मरण अतिशय मनापासून करून त्यांना अन्न अर्पण केल्याने त्याचे पुण्य आपल्याला मिळते. कारण पितर हे आपल्या वंशाचा एक भाग आहे, आणि त्यांची कृपादृष्टी ही प्रत्येकावर समान असते.

Pitru Paksha : आपण अर्पण केलेले अन्न पितरांना मिळत कसं? धर्म अभ्यासक सांगतात
Pitru Paksha 2022 | भाद्रपद महिन्यातच पितृपक्ष का..? जाणून घ्या कारण

पितरांचे आपल्यावर ऋण असतात. हा देहच मुळात आपल्याला त्यांच्यामुळे मिळाला आहे. त्यामुळे पितर फार पूजनीय आहेत. धार्मिक कर्मामध्ये देवाच्या मंगल पूजे आधी पितरांना नमस्कार करायला सांगतात ते याच पूजनीय व कृतज्ञ भावने मधूनच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com