भाद्रपदाचा वद्य पक्ष हा विशेष मानला जातो. कारण संपूर्ण 15 दिवस पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केला जातो. श्रद्धापूर्वक केल्या जाणाऱ्या पूर्वजांच्या स्मरणाला श्राद्ध म्हटले जाते. पितृपक्षात पितृलोकांतून सर्व पूर्वज पृथ्वीवर येतात व आपले वंशज आपल्यासाठी काय करतात, हे पाहतात, असा आपल्याकडे समज आहे.
पितृपक्षातील अखेरचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावास्या. सर्वपित्री अमावास्या विशेष मानली जाते. वर्षभरात येणाऱ्या सर्व अमावास्यांमध्ये सर्वपित्री अमावास्येला वरचे स्थान असून, याला विशेष महत्त्व आहे. सर्वपित्री अमावास्येला कोणते शुभ योग आहे ते पाहू या.
अमावस्या तिथी अर्धरात्रीनंतर 3 वाजून 25 मिनिटांपर्यंत असणार आहे.त्यानंतर प्रतिपदा तिथीची सुरुवात. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजून 55 मिनिटांपर्यंत त्यानंतर हस्त नक्षत्राची सुरुवात. आजच्या दिवशी शुभ योग संध्याकाळी 9 वाजून 5 मिनिटांपर्यंत असणार आहे .त्यानंतर शुक्ल योगाची सुरुवात होणार आहे. चतुष्पद करण अपरात्री 3 वाजून 19 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यानंतर किस्तुघ्न करणाची सुरुवात. चंद्र पुर्वान्ह 11 वाजून 22 मिनिटांपर्यंत सिंह नंतर कन्या राशीत संचार करेल
सूर्योदय वेळ 25 सप्टेंबर 2022 : सकाळी 06 वाजून 25 मिनिट
सूर्यास्त वेळ 25 सप्टेंबर 2022 : संध्याकाळी 06 वाजून 25 मिनिट
सर्वपित्री अमावास्येला चुकूनही या चुका करु नका, नाहीतर तुमचे पुर्वज होणार नाराज..
● दुसऱ्यांच्या निवास स्थानी किंवा भूमीवर श्राद्ध करू नये.
● श्राद्धात पितरांच्या तृप्तीसाठी ब्राह्मण द्वारे पूजा कर्म करवावं.
● ब्राह्मणाचा सत्कार न केल्याने श्राद्ध कर्माचे संपूर्ण फल नष्ट होतात.
● श्राद्धात सर्वप्रथम अग्नीला नैवेद्य अर्पित केलं जातं नंतर हवन केल्यानंतर पितरांच्या निमित्त पिंड दान केलं जातं.
● चांडाल आणि डुक्कर श्राद्धाच्या संपर्क आल्यास श्राद्धाचं अन्न दूषित होऊन जातं.
● रात्री श्राद्ध करू नये.
● संध्याकाळी आणि पूर्वाह्न काळात देखील श्राद्ध करणे उचित नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.