Agniveer Government Jobs After 4 Years
esakal
नवी दिल्ली : केंद्र सरकारने अग्निवीरांच्या सेवाकाळानंतरच्या पुनर्वसनासाठी महत्त्वाची योजना तयार केल्याची माहिती समोर आली (Agniveer Government Jobs After 4 Years) आहे. ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सेवेतून मुक्त होणाऱ्या अग्निवीरांना रोजगार मिळवून देण्यासाठी सरकारकडून विशेष ‘एक्झिट प्लॅन’ तयार करण्यात येत आहे. या योजनेमुळे सेवा संपल्यानंतर रोजगारासाठी भटकंती करण्याची वेळ अग्निवीरांवर येऊ नये, हा यामागील उद्देश आहे.