
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ दहशतवादी लाँच पॅडना लक्ष्य करून अचूक हवाई हल्ले केले. या लष्करी कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. ज्यात अनेक वरिष्ठ दहशतवादी कमांडर होते. तसेच ३५ ते ४० पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे, असे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी ही माहिती दिली.