सिसोदिया भाजपमध्ये गेले तर निर्दोष होतील पण...; अरविंद केजरीवाल यांची भाजपवर टीका |Arvind Kejriwal

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal esakal

दिल्लीत दारुवरील कथीत एक्साईज ड्युटी घोटाळाप्रकरणी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआयनं अटक केली असून ते पाच दिवसांच्या कोठडीत आहेत.

सुप्रीम कोर्टाकडून या अटकेपासून दिलासा मिळेल अशी त्यांना आशा होती पण कोर्टानं त्यांच्या याचिकेची दखल घेतली नाही. त्यानंतर अखेर सिसोदिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे,

ते म्हणाले की, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांची निर्दोष सुटका होईल, त्यांना फक्त 'आप'ला रोखायचे आहे, आम्ही पंजाबमध्ये आमचं सरकार आलं ते भाजपला सहन झालं नाहीत.

Arvind Kejriwal
भाव मिळत नाही! पिकांवर रोटर फिरवण्यासाठी अनुदान मिळावं; शेतकरी पुत्राचं थेट राष्ट्रपतींना पत्र

'आप' हे वादळ आहे ते थांबवू शकत नाही, त्याला कोणीही रोखू शकत नाही. दारू घोटाळा हे फक्त निमित्त आहे, त्या प्रकरणात कोणताही घोटाळा झाला नाही. दिल्लीत सुरू असलेली चांगली कामे थांबली पाहिजेत, अशी पंतप्रधानांची इच्छा आहे.

आम्ही शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उत्तम काम केले असून दोन्ही मंत्र्यांना तुरुंगात टाकले आहे. तरी देखील मी कोणतीही कामं बंद होऊन देणार नाही. अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com