राज्यगीतामधील दोन शब्द बदलल्याने बंगालमध्ये उफाळला वाद; नेमकं प्रकरण काय?

पश्‍चिम बंगालच्या राज्यगीतातील शब्द बदलल्याने राज्यात वाद सुरू झाला आहे.
Mamata Banerjee
Mamata Banerjeeesakal

कोलकताः पश्‍चिम बंगालच्या राज्यगीतातील शब्द बदलल्याने राज्यात वाद सुरू झाला आहे. कोलकता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रवींद्र संगीत- राज्यगीतातील दोन शब्द बदलण्यात आले. त्यामुळे टीका आणि निधेष व्यक्त होत आहे.

चित्रपट महोत्सवात राज्यगीत सुरू होण्यापूर्वी सर्व उपस्थितांना उभे राहण्यास सांगण्यात आले. यावेळी राज्यगीतामधील ‘बंगलाई'ऐवजी बंगला असा बदल केल्याने टीकेचा सूर उमटला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही फेसबुक पेजवर याचा निषेध केला आहे.

Mamata Banerjee
UPSC Main Exam Results: युपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल

रवींद्र संगीतातील शब्दांतील बदल सुरुवातीला सभागृहातील अनेकांच्या लक्षात आला नाही. पण सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीकेचे सूर उमटायला सुरुवात झाली.

ब्रिटिशांनी बंगालची फाळणी पूर्व बंगाल आणि पश्‍चिम बंगाल अशा दोन राज्यांत केली. पूर्व बंगालची राजधानी ढाका तर तत्कालिन कलकत्ता पश्‍चिम भागाची राजधानी होती. या फाळणीचा निषेध करण्यासाठी रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत रचले होते.

Mamata Banerjee
Supreme Court: 'दोन मिनिटांचं सुख...' हे विधान अत्यंत आक्षेपार्ह; सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाला सुनावलं

गाण्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन पश्चिम बंगालने ते राज्यगीत म्हणून स्वीकारले आहे. चित्रपट महोत्सवात गीतामधील ‘बंगालीर पोन’, ‘बंगालीर आशा’, ‘बंगालीर सोम’ हे शब्द का बदलले याबद्दल मुख्य गायक आणि राज्यमंत्री इंद्रनील सेन यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com