

Farmers and trade union members participate in Bharat Bandh protest rally demanding withdrawal of new labour laws in India.
जर तुम्ही आज कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर आज तु्म्हाला भारत बंदचा फटका बसू शकतो. देशातील दहा प्रमुख केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी संयुक्तपणे गुरुवारी भारत बंदची घोषणा केली आहे. वृत्तानुसार, ३ कोटींहून अधिक कामगार या निषेधात सामील होऊ शकतात, ज्याचा देशभरातील बँका, सरकारी कार्यालये, बाजारपेठा आणि वाहतूक सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आयएनटीयूसी, एआयटीयूसी, एचएमएस, सीआयटीयू, एआययूटीयूसी, टीयूसीसी, एसईडब्ल्यूए, एआयसीसीटीयू, एलपीएफ आणि यूटीयूसी यासह १० केंद्रीय कामगार संघटनांच्या युतीने १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.