कोरोनाच्या काळातही सरकार श्रीमंतासोबत: मायावती

Mayawati
Mayawati

लखनौ (उत्तर प्रदेश): जगभरात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ आहे. मात्र, या काळातही सरकार श्रीमंत नागरिकांसोबत आहे. दुसरीकडे मात्र गरिबांचा जीव जात आहे, अशी टीका बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली आहे.

औरंगाबादमध्ये (महाराष्ट्र) 16 मजूरांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला आहे. यावर बोलताना मायावती म्हणाल्या,  एकीकडे कोचिंगमध्ये शिकणाऱ्या श्रीमंत विद्यार्थ्यांसाठी खास बसेस पाठविल्या जात आहेत आणि परदेशात अडकलेल्या श्रीमंतांसाठी विशेष विमाने पाठविली जातात. पण, दुसरीकडे गरीब मजूर पायीच चालत आहेत. या आजाराच्या काळात जे लोक सर्वाधिक दुखी आहेत ते म्हणजे गरीब कामगार. रोजच्या भाकरीसाठी त्यांनी आपले घर सोडले आणि इतर राज्यात गेले. स्थलांतरित मजूर दु:खी असून केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्याशी चुकीचे वागत आहे. सरकारने या लोकांच्या अन्नासाठी योग्य व्यवस्थादेखील केलेली नाही, त्यामुळे ते उपासमारीने त्रस्त आहेत.'

'महाराष्ट्रात रेल्वे अपघातात 16 मजूर ठार झाले. केंद्र आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष आणि असंवेदनशीलतेचा हा परिणाम आहे. या मजुरांच्या कुटुंबांना सरकारने आर्थिक मदत दिली पाहिजे आणि कुटुंबातील सदस्याला नोकरी दिली पाहिजे. शिवाय, स्थलांतरित कामगारांना रेल्वे आणि बसने त्यांच्या घरी पोचवावे, असेही मायावती म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com