

Maharashtra Farmers
ESakal
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या सविस्तर बैठकीत शेतकरी आणि सहकारी क्षेत्राच्या अनेक प्रमुख मागण्यांवर एकमत झाले असून केंद्र सरकार लवकरच महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.