नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने टिप्पणी केल्यानंतरही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राजीनामा देण्यास तयार नसून लोकसभा निवडणुकीपर्यंत राजीनामा देणार नसल्याचे सांगण्यात आले.
एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मनमोहन व न्यायाधीश मनमीत प्रीतम अरोडा यांनी केजरीवाल यांच्यावर गंभीर टिप्पणी केली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सत्तेच्या लोभापोटी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले आहे. दिल्लीतील दोन लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके न मिळाल्याबद्दल जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर सुनावणी असताना न्यायधीशांनी थेट मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सत्तेसाठी राजीनामा न दिल्याचा तोंडी ठपका ठेवला आहे.
उच्च न्यायालयाची टिप्पणी आल्यानंतर आपच्या नेत्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. परंतु मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या राजीनाम्यावर दबाव वाढू शकतो. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होईपर्यंत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कोणत्याही स्थितीत राजीनामा द्यावयाचा नाही, असे मत आपच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल तुरुंगात असताना मतदारांमध्ये अधिक सहानुभूती निर्माण होऊ शकतो. याचा फायदा येत्या २५ मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी होईल, असा दावा आपच्या नेत्यांकडून केला जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.