

Boy's Viral Remark to Police Sparks Online Debate
Esakal
जिल्हाधिकाऱ्यांनी सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयोजित केलेल्या जनता दरबारमध्ये एका १३ वर्षांच्या आठवीत शिकणाऱ्या चिमुकल्यानं विचारलेल्या प्रश्नांवर प्रशासनातील बडे अधिकारीही निरुत्तर झाले. सध्या या चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आठवीत शिकणारा अमिताभ गुप्ता त्याची अडचण सांगण्यासाठी जिल्हाधिकारी अंजनी कुमार सिंह यांच्याकडे गेला होता. त्यावेळी थेट जिल्हाधिकाऱ्यांना त्याने असे काही प्रश्न विचारले की सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.