न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Supreme Court : राज्यपाल आणि राष्ट्रपतींना न्यायालय वेळेचं बंधन घालू शकत नाहीत यावरून सर्वोच्च न्यायालयात जोरदार वाद विवाद झाला. यावेळी सरन्यायाधीश बीआर गवई यांनी न्यायालयांचे हात बांधलेत असं आम्ही सांगू का? असं विचारलं.
Supreme Court Hearing: CJI Asks If Judiciary’s Hands Are Tied
Supreme Court Hearing: CJI Asks If Judiciary’s Hands Are TiedEsakal
Updated on

राज्यपाल आणि राष्ट्रपतींना विधानसभेनं मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी ९० दिवसांची वेळ मर्यादा निश्चित करण्यावरून सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंनी युक्तिवाद सुरू आहे. राष्ट्रपतींकडून या प्रकरणी रेफरन्स दाखल करण्यात आलाय आणि आता न्यायालयात यावर वादविवाद सुरू आहे. गुरुवारी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडताना आर्टिकल २००चा उल्लेख केला. संविधानाच्या या तरतुदीनुसार राज्यपालांची शक्ती व्यापक आहे. विवेकी बुद्धीने कोणत्या विधेयकावर निर्णय घ्यायचा हे त्यांच्या कक्षेत येतं. संवैधानिक आणि राजकीय शिष्टाचाराचं पालन करून राज्यपाल निर्णय घेतात. त्यांच्यासाठी कोणतीही वेळ मर्यादा लागू करणं चुकीचं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com