CM योगींचे पुन्हा नवे आदेश, म्हणे तीन दिवसात सामान्यांची....

यापूर्वी योगींनी सरकारी कर्मचाऱ्यांना जेवणासाठी केवळ अर्धा तासच सुट्टी मिळेल असे आदेश दिले आहेत.
CM Yogi Adityanath
CM Yogi Adityanathsakal

लखनऊ : उत्तर प्रदेशात दुसऱ्यांदा सत्तेवर आलेले योगी सरकार (Yogi Government) सातत्याने नवनवीन कठोर निर्णय घेत असून, आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी प्रशासकीय सेवेतीव अधिकाऱ्यांसाठी नवा आदेश जारी केला आहे. त्यानुसार राज्यातील सर्वच सरकारी कार्यालयात नागरिक चार्टर लावण्याचे आदेश योगींनी अधिकाऱ्यांना दिले असून, तीन दिवसांपेक्षा अधिक काळ कुठलीही फाईल टेबलावर पेंडिंग न ठेवण्याचे निर्देशही योगींनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Yogi Adityanath News)

CM Yogi Adityanath
जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदीसाठी पुरंदरेंनी लिहिलं होतं पत्र; मनसेनं आणलं समोर

अधिकाऱ्यांना आदेश देताना योगींनी म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचा लवकरात लवकर निपटारा करा. याबरोबरच प्रत्येक कार्यालयात नागरिक सेवा चार्ट लावण्यास सांगितले आहे. या बरोबरच कोणत्याही कार्यालयात एखाद्या विषयासंबंधीची फाईल तीन दिवसांपेक्षा अधिक काळ पेंडिंग राहता कामा नये, असे दिसून आल्यास कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यास विलंबाबाबत उत्तर द्यावे लागले असेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.

CM Yogi Adityanath
जेंव्हा योगी आणि अखिलेश यादव एकमेकांना मनस्वी भेटतात... पाहा व्हिडीओ

जेवणासाठी केवळ अर्धा तास

अवघ्या काही दिवसांपूर्वीच योगी सरकारने उत्तर प्रदेशातील सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी कडक सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तासच जेवणाची सुट्टी मिळणार आहे. त्याचबरोबर सरकारी कार्यालयांमध्ये चांगले वातावरण राहण्यासाठी आणि काम लवकर होण्यासाठी वेळेवर कार्यालयात येण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशामुळे तासंतास जेवणासाठी सुटी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लगाम लागण्यास मदत होणार आहे.

CM Yogi Adityanath
रणबीरच्या शेजाऱ्यांची पोलिसांत तक्रार; म्हणाले, 'लग्न ह्याचं,त्रास आम्हाला'

शासकीय कार्यालयांमध्ये शिस्तीचे वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला. यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेळेवर कार्यालयात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लंच ब्रेक अर्ध्या तासापेक्षा जास्त घेऊ नये असे सांगण्यात आले आहे. यासोबतच जेवणाच्या सुट्टीनंतर सर्वांनी लगेच कार्यालयात हजर राहणे आवश्यक असणार आहे.

लंच ब्रेकमध्ये कर्मचारी अनेक तास कार्यालयातून गायब होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी अनेक पातळ्यांवर शासनापर्यंत पोहोचत होत्या. त्याशिवाय कार्यालयाच्या वेळाही पाळल्या जात नसल्याच्या तक्रारी होत्या. दरम्यान, या सर्व गोष्टी बदलण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी आता योगी सरकारकडून नवनवे नियम लागू केले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com