'भारत जोडो’ यात्रेनंतर मित्रपक्ष, विरोधक आम्हाला हलक्यात घेऊ शकणार नाही : काँग्रेस

Rahul Gandhi
Rahul Gandhi

कन्याकुमारी : 'भारत जोडो' यात्रेनंतर काँग्रेस पक्ष नवीन अवतारात येणार असून तो पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक आणि सक्रिय असेल. त्यामुळे मित्रपक्ष आणि विरोधक दोघेही काँग्रेसला हलक्यात घेऊ शकणार नाहीत, असं पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी भारतीय जनता पक्षाच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटलं. (Bharat Jodo Yatra news in Marathi)

Rahul Gandhi
'मेक इन इंडिया' धोरणामुळे भारतीय सैन्याला शस्त्रांचा तुटवडा; ब्लूमबर्गचा रिपोर्ट

'भारत जोडो' यात्रा काँग्रेसमध्ये नवचैतन्य भरणारी असल्याचे सांगून ते म्हणाले की, यामुळे पक्ष मजबूत होईल आणि पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळेल. रमेश पुढं म्हणाले की, १३७ वर्षांच्या इतिहासात काँग्रेसमध्ये अनेक वेळा परिवर्तन झाले आहे. आता हा प्रवास काँग्रेसला नव्या अवतारात आणणार आहे. काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक आणि सक्रिय होईल. त्यामुळे आमचे मित्रपक्ष आणि राजकीय विरोधक काँग्रेसला हलक्यात घेऊ शकणार नाहीत.

दरम्यान काँग्रेस देशातील सर्वात जुना पक्ष आहे. काँग्रेस सत्तेत नसलं तरी प्रत्येक भागात, प्रत्येक गावात पक्ष अस्तित्वात आहे. भाजपकडून हल्लाबोल यात्रा सुरू करण्यात आली आहे. मात्र भाजपकडून करण्यात येत असलेला हल्लाबोल हा अस्वस्थेतून असल्याचंही रमेश यांनी नमूद केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com