'भाजपमधल्या बंडखोरांनी ईश्वराप्पांना धक्का दिला. सदानंद गौडा यांना धक्का दिला. आणखी काही जणांचा नंबर लागणार आहे.'
बंगळूर : राज्यात भाजपच्या (BJP) विनाशाचा कालखंड ८-९ महिन्यांपूर्वी सुरू झाला आहे. पण, आता ते समोर येत आहे, असे काँग्रेस (Congress) आमदार लक्ष्मण सवदी (Laxman Savadi) यांनी भाकीत केले. भाजपला ज्येष्ठता, संघटना आणि ताकद असलेल्या लोकांची गरज नाही. एकूणच भाजपची अधोगती अटळ आहे हे निश्चित, असेही ते म्हणाले.
मंगळवारी विकाससौध येथे बोलताना सवदी म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) आम्हाला फक्त मोदी पंतप्रधानपदी हवेत. त्यानंतर आम्ही त्यांना शहाणपण शिकवू, असे भाजपमधील काही लोक सांगत आहेत. भाजपमधल्या बंडखोरांनी ईश्वराप्पांना धक्का दिला. सदानंद गौडा यांना धक्का दिला. आणखी काही जणांचा नंबर लागणार आहे.’’
जगदीश शेट्टर यांच्या लढतीबाबत बोलताना ते म्हणाले, ‘‘कोणती मेंढी कुठे बांधायची आणि कुठे बळी द्यायचा, याचे नियोजन भाजपने पद्धतशीरपणे केले आहे. शेट्टर यांना उमेदवारी देतील. मात्र त्यांनी संसदेत जाऊ नये. संसदेत गेल्यास मंत्रीपद द्यावे लागेल, अशी योजना आहे. शेट्टर यांना सर्व माहिती आहे. निवडणुकीनंतर ते बोलतील. ते अचानक भाजपमध्ये दाखल झाले. अचानक उमेदवार झाले आणि अचानक त्यांचा पराभवही होईल.
ईश्वरप्पा हे ज्येष्ठ नेते आहेत. शेट्टर आणि मी भाजप सोडताना त्यांनी माध्यमांसमोर काही गोष्टी सांगितल्या होत्या. ‘शेट्टर आणि मी भाजप सोडायला नको होता. पक्षाने त्यांना सर्व काही दिले आहे’, असे ईश्वराप्पा त्यावेळी म्हणाले होते. पण मी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर ईश्वराप्पा काय बोलतात ते पहा. त्यावेळी मी जे सांगितले, ते आता खरे ठरले आहे.’’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.