नवी दिल्ली Coronavirus : जगभरात कोरोना व्हायरसचा होत असलेला फैलाव आणि भारतापुढं उभं राहिलेलं आव्हान या पार्श्वभूमीवर आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं. कोरोनाचा भारतावर परिणाम होणार नाही, हा भ्रम असल्याचं सांगत त्यांनी देश वासियांना सावध केलं.
पंतप्रधान मोदींचे आवाहन
संकल्प आणि संयम या मार्गानेच कोरोनाच्या आव्हानाला सामोरं जाता येईल, असं सांगूनमोदी म्हणाले, 'मी देशवासियांकडून आज काही तरी मागणार आहे. जनतेनं कधीही मला निराश केलेलं नाही. कोरोनाशी मुकाबला म्हणजे, हा जनता कर्फ्यू आहे. येत्या रविवारी 22 मार्च रोजी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचं पालन करायचं आहे. या काळात कोणीही घराबाहेर पडायचं नाही. त्यांनी दिवशी सगळ्यांनी घरी बसायचं. हा एक प्रयोग आहे. या अनुभवातून आपल्याला पुढचं आव्हान पेलण्यासाठी दिशा मिळेल. अत्यावश्यक सेवांशिवाय कोणीही त्या दिवशी घरातून बाहेर पडू नये. आतापासून सर्व स्वयंसेवी संघटना, संस्थांनी याबाबत जनजागृतीचं काम सुरू करायला हवं. हा कर्फ्यु यशस्वी होण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी भारत किती तयार आहे. हेदेखील यातून स्पष्ट होईल.'
महारोगाच्या विरोधातील लढाईत मानव जातीचा विजय होईल. प्रत्येकजण त्याचं योगदान देत आहे. तुम्हीही द्या. स्वतःला या रोगापासून वाचवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपण सगळे एक होऊ या आणि या आव्हानाला तोंड देऊया.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
नरेंद्र मोदी म्हणतात
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.