नवी दिल्ली : जवाद चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये NDRF ची आठ पथके तैनात करण्यात आली आहेत. कोलकत्यात दोन आणि दक्षिण 24 परगणा, उत्तर 24 परगणा, पूर्व मिदनापूर, पश्चिम मिदनापूर, हुगळी आणि नादिया येथे प्रत्येकी एक-एक टीम तैनात करण्यात आली आहे. तर, आज रात्रीपर्यंत आणखी आठ पथके तैनात करण्यात येणार आहेत. जवाद चक्रीवादळाच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक पार पडली.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) चक्रीवादळ तयार होण्याचा इशारा दिल्यानंतर 4 डिसेंबरच्या सकाळपर्यंत आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर 90 किमी प्रतितास ते 100 किमी प्रतितास वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे या ठिकणच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तत्पूर्वी बुधवारी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या (NCMC) बैठकीत बंगालच्या उपसागरात येऊ घातलेल्या चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्रीय मंत्रालयांच्या संस्था आणि राज्य सरकारांच्या तयारीचा आढावा घेतला.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर आम्ही पंतप्रधानांना पुढील 3 दिवसांच्या हवामानाबाबत माहिती दिली आहे. तसेच संभव्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर गृहसचिवांनी पंतप्रधानांना सर्व व्यवस्थेची माहिती दिली आहे, अशी माहिती अतुल करवाल, डीजी एनडीआरएफ यांनी दिली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.