Delhi-Mumbai Expressway Accident
Esakal
राजस्थानातील अलवर जिल्ह्यात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस आणि केमिकलने भरलेला टँकर यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे ३० प्रवासी जखमी झाले आहेत. ही दुर्घटना एक्सप्रेसवेवरील चॅनल १०० इंटरचेंज पुलाजवळ घडली.