delhi tractor parade farmers congress rahul gandhi
delhi tractor parade farmers congress rahul gandhi

दिल्लीत शेतकरी आक्रमक झाल्यानंतर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया; आंदोलकांना आवाहन

नवी दिल्ली - दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेतकऱी संघटनांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देण्यावरून गेल्या दोन आठवड्यात बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर अखेर शांततापूर्ण मार्गाने आंदोलनासाठी परवानगी दिली गेली. मात्र दिल्लीत आंदोलनाला हिंसक वळण लागले असून आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न केला. यावेळी शेतकरी दिल्लीतील लाल किल्ल्यावरही गेले आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचाही मारा केला. 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विटरवरून आंदोलनात सुरु झालेल्या हिंसाचारानंतर प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत असं म्हटलं आहे. हिंसाचार हा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही. कोणालाही दुखापत झाली तरी नुकसान आपल्याच देशाचं होईल असं म्हणत राहुल गांधी यांनी देशहितासाठी कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी केली.

दरम्यान, या प्रकरणी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी कोणतीही हिंसा होणरा नाही आणि यापुढचे आंदोलन शांततेत करतील असंही ते म्हणाले. तसंच पोलिसांनी रिंग रोडवरून रॅलीसाठी परवानगी मागितली होती. पोलिसांनी संख्या बघून परवानगी द्यायला हवी होती असंही टिकैत यांनी सांगितलं.

योगेंद्र यादव यांनी हिंसाचाराच निषेध केला. जे झालं ते लाजिरवाणं आणि घृणास्पद आहे. आपल्याला असं काही करायचं नाही. हिंसा करणारे आंदोलक आमचे नाहीत असंही त्यांनी म्हटलं. हिंसा थांबवून शांततेनं आंदोलन करा असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com