फेसबुककडून निवडणुकांवर प्रभाव टाकला जातोय; काँग्रेसचा गंभीर आरोप

संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी केली मागणी
facebook
facebookesakal

नवी दिल्ली : फेसबुकच्या माध्यमातून भारतातील निवडणुकांवर प्राभव टाकण्याचा आणि लोकशाहीला कमजोर करण्याचा प्रयत्न होत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे याची संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

facebook
समीर वानखेडे मागासवर्गीय असल्याचं दाखवून फायदा घेताहेत - जयंत पाटील

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले, भारतात फेसबुक प्लॅटफॉर्मवर वाईट भाषेत पोस्ट करण्यात येत आहे. याविरोधात कारवाई सुरु न केल्याबद्दल सोशल मीडियातील दिग्गज कंपनी असलेल्या फेसबुकने स्वतःला एका फेसबुकमध्ये रुपांतरीत केलं आहे. खेडा यांच्या या आरोपांवर फेसबुक इंडियाच्यावतीनं कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

भाजपचा सहकारी म्हणून फेसबुक काम करतंय

काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी असाही आरोप केला की, फेसबुक सत्तारुढ भाजपच्या सहकाऱ्याच्या रुपात काम करत आहे. तसेच आपल्या अजेंड्याला पुढे रेटत आहे. फेसबुक संदर्भात काम केलेले व्हिसल ब्लोअर फ्रांसिस हौगेनच्या संशोधन अहवालाचा हवाला देताना त्यांनी आरोप केला की, हिंदी आणि बांगला भाषेत अशा प्रकारे घृणास्पद पोस्ट करणाऱ्यांच्या विरोधात फेसबुकने कोणतीही निर्णायक कारवाई केली नाही. खेडा पुढे असंही म्हणाले की, फेसबुकच्या अंतर्गत अहवालात १० लाखांहून अधिक खाती नकली असल्याचं समोर आलं आहे. तरी देखील त्यांनी यावर काहीही केलेलं नाही. भारतातील निवडणुकांवर प्रभाव टाकणाऱ्या फेसबुकच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी आम्ही संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीची मागणी करत आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com