धुक्यामुळे अपघात, शोकसभेवरुन परतणाऱ्या ३ सख्ख्या भावांचा मृत्यू

road accident
road accidentsakal media

राजस्थान : येथील नागौर जिल्ह्यात (Accident in Rajasthan Nagaur) कार आणि बसचा शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. रस्त्यावर पसरलेल्या धुक्यामुळे कार आणि बसची (car and bus accident) जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, कारमध्ये प्रवास करणारे पाच प्रवासी या अपघातात ठार (Five people killed) झाले असून दोघे जखमी झाले. मृतांमध्ये एका वृद्ध महिलेचाही समावेश आहे. सिता (65), संजू (२२), राहूल (१०), अजय (५) आणि भलीराम (४२) अशी मृतांची नावे आहेत. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. (Five people killed in car and bus accident at Rajasthan nagaur district)

road accident
हॉस्पिटल झाले परीक्षा हॉल; विद्यार्थी आणि पर्यवेक्षक दोन्ही कोरोनाबाधित

जोधपूर महामार्गावर चिमरानी गावाजवळ शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव बस जोधपूरवरुन नागौरमार्गे बीकानेर येथे जात होती. तर कार जोधपूरच्या दिशेने जात होती. कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसने धडक दिली. धुक्यामुळे महामार्गावरील दृश्यमानता कमी होती. यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

अपघातात संजू, राहुल, सीता आणि भालीराम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अजयचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. कारमधील सर्व प्रवासी हे गावातील नातेवाईकाच्या शोकसभेवरुन घरी परतत होते. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com