कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये ४३९ दहशतवादी ठार; केंद्राने दिली माहिती

kashmir
kashmirfile photo
Summary

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद यांनी आकडेवारी जाहीर केली. तसंच एकूण किती जवान शहीद झाले याचीही त्यांनी माहिती दिली.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर झालेल्या दहशवतादी घटना आणि त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत राज्यसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद यांनी आकडेवारी जाहीर केली. तसंच एकूण किती जवान शहीद झाले याचीही त्यांनी माहिती दिली.

गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत सांगितलं की, जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर ४३९ दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आलं. दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये नागरीक आणि सुरक्षा दलाच्या जवानांना प्राण गमवावे लागले. ९८ नागरिकांचा मृत्यू तर १०९ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले. कलम ३७० हटवल्यानंतर आतापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये ५४१ चकमकीच्या घटना घडल्या आहेत.

kashmir
डिजिटल रुपया रोखमध्ये कसा बदलायचा?, PM मोदींनी केलं स्पष्ट

याआधी राज्यसभेत दहशतवादी संघटना आणि दहशतवाद्यांची माहिती देण्यात आली आहे. भारताने देशात एकूण ४२ संघटनांची दहशतवादी संघटनांच्या यादीत नोंद केली आहे. तसंच युएपीए अंतर्गत ३१ जणांची नोंद दहशतवादी म्हणून करण्यात आल्याचं त्यांनी राज्यसभेत सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com