
पाकिस्तानने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या अयशस्वी प्रयत्नांना भारताने योग्य उत्तर दिले आहे. यानंतर आता भारताने पाकिस्तानच्या लोहार आणि सियालकोटवर ड्रोन हल्ला केला आहे. भारताने लाहोरमधील AWACS हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली आहे. यापूर्वी, पाकिस्तानने जम्मू, राजस्थान आणि पंजाबमधील अनेक भागात ड्रोन हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता, ज्याला भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने योग्य उत्तर दिले.