India Pakistan Tension
esakal
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पाण्याचा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताला थेट इशारा देत पाकिस्तानचं पाणी ही ‘रेड लाइन’ असल्याचं म्हटलं आहे. पाण्याच्या हक्काला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला थेट उत्तर दिलं जाईल, असा इशारा शरीफ यांनी दिला आहे. इस्लामाबादमध्ये ‘यादगार-ए-फतह’ या विजय स्मारकाच्या उद्घाटनावेळी शरीफ बोलत होते.