
सध्या भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध हा जगभरातील चर्चेचा विषय ठरला आहे. या युद्धात सीमेलगत सतत गोळीबार सुरू आहे. भारताने पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांवर बॉम्बस्फोट करत त्यांना मोठा धक्का दिला आहे. मात्र तरीही पाक शरण येण्यास तयार नाही. नौदल, हवाईदल आणि भूदल हे सगळेच सैन्य आता पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जसे भारताने पाकिस्तानच्या मुख्य शहरांवर बॉम्बहल्ले केले तसे पाकिस्तानही भारताच्या मुंबई, दिल्लीसारख्या शहरांवर हल्ले करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशात आता नुकतीच मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक पार पडलीये.