
22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याने 26 निरपराध नागरिकांचा बळी घेतला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. पीडित कुटुंबांच्या डोळ्यांतील अश्रू आणि हृदयातील वेदना अजूनही ताज्या होत्या. पण बुधवारी पहाटे भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांनी या कुटुंबांना न्यायाचा आधार दिला आहे. या कारवाईने दहशतवाद्यांच्या कंबरड्याला जबरदस्त धक्का बसला असून, पीडित कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू तरळले आहेत.