रेल्वे अपघात रोखणारे 'कवच' तंत्रज्ञान नेमकं काय?

जगातील सर्वात स्वस्त स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली म्हणून 'कवच' ची जाहिरात केली जात आहे.
indian railways
indian railwaysSakal

नवी दिल्ली : स्वदेशी बनावटीच्या ट्रेन अपघात संरक्षण प्रणाली 'कवच' ची सिकंदराबादमध्ये शुक्रवारी (दि.4) यशस्वी चाचणी घेण्यात आली, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट करून दिली आहे. या चाचणीदरम्यान दोन रेल्वेगाड्या विरुद्ध दिशेने वेगाने एकमेकांसमोर चालवल्या गेल्या. मात्र, या दोन्ही रेल्वेंची धडक होण्यापूर्वीच रेल्वे 380 मीटरवर रोखली गेली. यामुळे संभव्य अपघात रोखला गेला. विशेष म्हणजे, या प्रणालीची चाचणी ज्या दोन रेल्वेंमध्ये करण्यात आली त्यातील एका रेल्वेमध्ये खुद्द रेल्वेमंत्री अश्विन वैष्णवदेखील प्रवास करत होते. (Kavach Technology Test Successfully By Indian Railway )

दरम्यान, दोन्ही ट्रेन एकमेकांना धडकण्यापूर्वीच 380 मीटरवर रोखण्यात यश आल्याचे रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी सांगितले आहे. हे केवळ कवच या प्रणालीमुळेच शक्य झाल्याचे ते म्हणाले. या चाचाणी एक व्हिडिओदेखील त्यांनी शेअर केला आहे. जगातील सर्वात स्वस्त स्वयंचलित ट्रेन टक्कर संरक्षण प्रणाली म्हणून 'कवच' ची जाहिरात रेल्वेकडून केली जात आहे. 'शून्य अपघात' हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रेल्वेला मदत करण्यासाठी स्वदेशी विकसित ऑटोमेटेड ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

indian railways
डोळ्यात टाकलं हार्पिक अन् झंडूबाम; लुटण्याचा नवीन फंडा

कवचची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, निर्धारित अंतरावर त्याच मार्गावर दुसरी ट्रेन आल्याची माहिती मिळाल्यास ती आपोआप थांबेल. या डिजिटल सिस्टिममुळे रेड सिग्नलकडे दुर्लक्ष करणे किंवा अन्य काही बिघाड अशा मानवी चुकांमुळे ट्रेन आपोआप थांबतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ही प्रणाली बसवल्यास परिचालन किंमत प्रति किलोमीटर 50 लाख रुपये इतका येईल. तर जागतिक स्तरावर अशा सुरक्षा यंत्रणेची किंमत प्रति किलोमीटर सुमारे 2 कोटी रुपये इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कवच प्रणालीमध्ये विशेष काय

'कवच' प्रणालीमध्ये उच्च वारंवारिता रेडिओ कम्युनिकेशनचा (Radio Communication) वापर करण्यात येतो.तसेच कवच SIL-4 (सिक्युरिटी स्टँडर्ड लेव्हल फोर) शी सुसंगत असून, जी कोणत्याही सुरक्षा प्रणालीमधील सर्वोच्च पातळी असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. ही प्रणाली सुरू झाल्यानंतर, पाच किलोमीटरच्या परिसरातील सर्व गाड्या शेजारील रुळांवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या सुरक्षिततेसाठी थांबल्या जाणार असून, कवचला 160 किमी प्रतितास वेगासाठी मान्यता देण्यात आली आहे.

indian railways
अटक टळताच रश्मी शुक्लांविरोधात आणखी एक गुन्हा ; अडचणीत वाढ

2022 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत 'कवच' अंतर्गत 2,000 किमीपर्यंत रेल्वेचे जाळे निर्माण करण्याची योजना असून, दक्षिण मध्य रेल्वेच्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये आतापर्यंत १०९८ किमी मार्गावर कवच बसविण्यात आले आहे. त्याशिवाय दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा रेल्वे मार्गावरही कवच ​बसवण्याची योजना असून, ज्यांची एकूण लांबी सुमारे 3000 किमी इतकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com