फलटण : आज, २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजता, वीर धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या सांडव्यावरून ४६३७ क्युसेक आणि अतिवाहकाद्वारे ११०० क्युसेक, असा एकूण ५७३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण आणि धरणात होणारी पाण्याची आवक यानुसार नदीपात्रातील विसर्ग कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी याची नोंद घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग यांनी केले आहे.