Narendra Modi
Narendra ModiSakal

Narendra Modi : उर्वरित चांगले कामही पूर्ण करू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आश्‍वासन

जे काही चांगले काम करायचे राहिले आहे, ते देखील पूर्ण करू, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्की धाम येथे भूमिपूजन सोहळा आयोजित प्रसंगी आज दिले.

लखनौ - जे काही चांगले काम करायचे राहिले आहे, ते देखील पूर्ण करू, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिले. पंतप्रधानांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील संभल येथील कल्की धाम येथे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनौ येथे दहा लाख कोटींच्या विविध विकास कामांचे उद््घाटन केले. राज्याची अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी प्रयत्न कसे करायला हवेत, हे अन्य राज्यांनी देखील पाहिले पाहिजे, असे मोदी म्हणाले.

कल्की धाम मंदिराचे भूमिपूजन केल्यानंतर आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपल्या देशात भक्ती आणि अध्यात्माचा आणखी एक प्रवाह वाहण्यासाठी आतुर झाला आहे. आज आणखी एका पवित्र धामची पायाभरणी केली जात आहे. भव्य कल्की धामचे भूमिपूजन करण्याचे भाग्य मला लाभले. कालांतराने हे ठिकाण भारतीय श्रद्धेचे आणि आस्थेचे केंद्र म्हणून नावारूपास येईल.

आताच आचार्य यांच्याशी अनौपचारिक चर्चा करताना धामची पायाभरणी करण्याचा १८ वर्षानंतर योग आल्याचे त्यांनी मला सांगितले. यावेळी आचार्यांकडे पाहत मोदी म्हणाले, ‘अर्थात जे काही चांगले काम माझ्यासाठी राहिले असून ते पूर्ण करत आहे.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचाही उल्लेख केला.

कल्की धामबाबत ते म्हणाले, कल्की निर्माण ट्रस्टचे प्रमोद कृष्णम यांनी कल्की धामच्या भूमिपुजनाचे निमंत्रण दिले, तेव्हा अनेक विषयांवर चर्चा झाली. आजच्या भूमिपूजनाचा आनंद हा त्यांच्यापेक्षा त्यांच्या आईला अधिक होत आहे. आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी एक मुलगा आपले जीवन कसे पणाला लावतो हे प्रमोद कृष्णम यांनी दाखवून दिले. या मंदिरांत दहा गर्भगृह असतील आणि ईश्‍वराच्या दहा अवतारांना विराजमान केले जाईल, असेही मोदी म्हणाले.

बरे झाले, तुम्ही काही दिले नाही

स्वागतपर बोलताना प्रमोद कृष्णम यांनी सांगितले की, प्रत्येकाकडे देण्यासाठी काही ना काही असते, मात्र माझ्याकडे काहीच नाही. आपण केवळ भावना व्यक्त करू शकतो. यावर मोदी म्हणाले, ‘बरे झाले, प्रमोदजी आपण काही दिले नाही.

अन्यथा काळ एवढा बदलला आहे की आजच्या युगात सुदामाने श्रीकृष्णाला एका पुरचुंडीत पोहे जरी दिले असते तरी त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असता. सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली असती आणि श्रीकृष्णावरही भ्रष्टाचाराचा आरोप केला गेला असता. यात आपण कशाला अडकायचे. चांगले झाले, आपण काही दिले नाही.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com