केळी उत्पादक तालुका म्हणून शहादा तालुक्याची ओळख आहे मात्र आता याच तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत, युद्धाचा थेट परिणाम या शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळत असून दरवर्षी या तालुक्यातून हजारो टन केळी ही आखाती देशांमध्ये निर्यात केली जात असते मात्र युद्ध सुरू असल्याने ही केळीची निर्यात आता बंद झाल्यामुळे एक्सपोर्ट कॉलिटी ची ही केळी आता देशातच पडून असल्याने कवडीमोल दरात केळी विकण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आलेली आहे, एक्सपोर्ट कॉलिटी ची किडीला लावलेला दर देखील आता निघत नसल्याने शेतकरी ना नुकसान सहन करावा लागत असल्याची परिस्थिती आहे परिणामी व्यापारी देखील केळी खरेदी कडे पाठ फिरवत असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.. शासनाने या गोष्टीकडे लक्ष देत यावर तोडगा काढावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते