ग्राहकांची सुरक्षितता वाढविण्यासाठी आणि फसवणूक कमी करण्यासाठी आरबीआयने आजपासून पेमेंट अॅग्रीगेटर्ससाठी नवीन नियम लागू केले आहेत. त्यात कठोर पात्रता, विवाद निराकरण धोरण आणि आर्थिक स्थिरता आवश्यकतांचा समावेश आहे.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मंगळवारी मुंबई आणि त्याच्या उपनगरात ढगाळ आकाश आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. दिवसा विजांसह गडगडाटी वादळे येण्याची शक्यता असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. त्यामुळे हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट दिला असून विजांसह गडगडाट आणि ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बीडच्या शृंगारवाडी येथील सभेत लक्ष्मण हाके यांनी मराठा मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. आमचे ११ सुशिक्षित क्वालिफाईड मुलं आहेत. तुमच्या अकरा मुलींचा विवाह आमच्या मुलांसोबत लावा असे वक्तव्य केल्यानंतर बीडच्या तलवाडा मध्ये लक्ष्मण हाके यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जालन्यात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडला आहे अर्जून खोतकऱ्यांच्या दौऱ्यावेळी हा प्रकार घडला.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली.यावेळी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची भरपाईबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. तिजोरी लुलण्याचं काम सुरु असल्याचे राज्यावर कर्जाचा बोजा वाढला, असेही ते म्हणाले. तसेच अर्थखात्याची श्वेतपत्रिका जाहीर करा, नाही तर आम्ही काळी पत्रिकाचा जाहीर करू, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.
जामनेर जळगाव रोड वरील चिंचखेडा बुद्रुक येथील खडकी नाल्याच्या पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने जळगाव जामनेर वाहतूक ठप्प झाली असून ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे
कॉंग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. दरम्यान ही भेट कशासाठी होती याचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.
विदर्भात नागपूर विभागात गेल्या 8 महिन्यात 296 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आलीय. सरकारी पातळीवर शेतकरी आत्महत्या प्रकरणी अनास्था असल्याचं चित्र दिसून येतंय. एप्रिल महिन्यात सर्वाधिक 50 शेतकरी आत्महत्या झाल्या. तर गेल्या ऑगस्ट महिन्यात 28 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं. गेल्या आठ महिन्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपोटी 1 कोटी 58 लाख रुपयांचा मदतनिधीही वितरीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे जिल्ह्याला हवामान विभागानं यलो अलर्ट दिला आहे. पुढील ३ तासात जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.
बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. परळी तालुक्यातील वानटाकळी गावात तर एका शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत त्याच्या जनावरांसाठी साठवलेली कडब्याची गंजी पुराच्या पाण्यात वाहून गेली. ही घटना वानटाकळी गावात घडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.