Mallikarjun Kharge sakal
देश
Mallikarjun Kharge : ‘‘संविधान बचाओ यात्रा’ने भाजपला धडकी भरली! मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली तिव्र टीका
Unemployment In India : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनी टीका केली. त्यांनी भाजपच्या अपयशाचे लपवणारे नाटक म्हणून संविधान हत्या दिवस पाळण्याचा आरोप केला.
‘‘काँग्रेसच्या संविधान बचाओ यात्रेमुळे भाजपला धडकी भरली आहे. म्हणूनच ते ५० वर्षांपूर्वीच्या आणीबाणीची आठवण करून देत आहेत. केवळ स्वतःचे अपयश लपविण्यासाठीच आणीबाणीचे ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संविधान हत्या दिवस पाळत आहेत,’’ अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर आणि सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे.