पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज बीरभूम जिल्ह्यातील बोगतुई (Bogtui) गावाला भेट दिली. यावेळी ममता म्हणाल्या की, बहाणे चालणार नाही, जे या घटनेसाठी जबाबदार आहेत, त्यांना तात्काळ ताब्यात घ्या. बंगालमध्ये हे असं होऊ शकतं असं मला कधीच वाटलं नव्हतं. एका आई आणि मुलाचा या घटनेत मृत्यू झाला. हे मोठं षडयंत्र असल्याचा आरोप करत बॅनर्जी यांनी कठोर कारवाईची घोषणा केली आहे. तसंच हत्येमागील कारणांचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
ममता बॅनर्जी यांनी या भागाची पाहणी करतानाच एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याला फोन केला. तक्रारींची उत्तरं देण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांना शिक्षा व्हायला हवी, असं त्यांनी या अधिकाऱ्याला स्पष्ट सांगितलं. "मला कोणताही बहाणा नकोय. दोषींना अटक व्हावी आणि चुकलेल्या पोलिसांना शिक्षा व्हावी, अशी माझी इच्छा आहे. तसंच घटनेच्या साक्षीदारांनाही पोलिसांनी संरक्षण दिलं पाहिजे" असं त्या म्हणाल्या.
तसंच ज्यांची घरं जळण्यात आली आहेत, त्यांच्या घरांच्या दुरुस्तीसाठी ममता बॅनर्जी यांनी 1 लाख दिले जातील अशी घोषणाही ममता बॅनर्जींनी केली. यासोबतच पीडितांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. दरम्यान, मंगळवारी बोगतुई गावात काही घरांना आग लावण्यात आली होती, ज्यात आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.