भेदभाव न करता हिंसाचारातील बळींना प्रत्येकी 2 लाख; ममतांची घोषणा

भेदभाव न करता हिंसाचारातील बळींना प्रत्येकी 2 लाख; ममतांची घोषणा

कोलकाता : पश्चिम बंगालमधील सहा जिल्ह्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात 8 जणांची हत्या झाली असून, यात भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे, असा दावा भाजपने केला होता. तृणमूल काँग्रेसने हा हिंसाचार केल्याचा आरोप भाजपने केला होता. दरम्यान, कोलकत्यात एक आणि सोनारपूरमध्ये एक असे दोन जण ठार झाले आहेत. तृणमूल काँग्रेसने मात्र, आपल्याच दोन कार्यकर्त्यांचा हिंसाचारात मृत्यू झाल्याचा दावा केला होता. आता या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मदत जाहिर केली आहे.

त्यांनी म्हटलंय की, निवडणुकीनंतरच्या हिंसाचारात ज्यांचा मृत्यू झाला आहे अशांना कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येकी दोन लाखाची भरपाई दिली जाईल. निवडणुक आयोगाच्या कायदा आणि सुव्यवस्थेनुसार, 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील अर्धे लोक तृणमूल काँग्रेसचे तर अर्धे भाजपचे होते. आणि एक संयुक्त मोर्चाचा कार्यकर्ता होता.

भेदभाव न करता हिंसाचारातील बळींना प्रत्येकी 2 लाख; ममतांची घोषणा
विद्युतदाहिनीच्या चिमणीचा धूर थांबणार; पुणे महापौरांकडून दखल
भेदभाव न करता हिंसाचारातील बळींना प्रत्येकी 2 लाख; ममतांची घोषणा
एका चुकीमुळे बंगालमध्ये डावे शिखरावरुन शून्यावर आले?

पुढे मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी म्हटलंय की, भाजपचे नेते प्रक्षुब्ध वातावरण निर्माण करत इकडे तिकडे फिरत आहेत. नवं सरकार स्थापन होऊन अद्याप 24 तास देखील उलटले नाहीयेत. मात्र, ते पत्रं पाठवत आहेत, टीम आणि नेते भेटायला येत आहेत. वास्तवात ते जनमताचा कौल स्विकारण्यास तयार नाहीयेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी जनमताचा कौल स्विकारावा.

राज्यातील या हिंसाचाराचा निषेध काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी केला आहे. या वाढत्या हिंसाचाराची दखल घेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या मंगळवारी संबंधित अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. हिंसाचार करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश देखील ममता बॅनर्जी यांनी दिले होते.

दरम्यान, तृणमूल काँग्रेस हा असहिष्णू पक्ष आहे. पण, भाजप पक्ष लोकशाही मार्गाने विचारांची लढाई लढण्यास कटिबद्ध आहे, असे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या घरी भेट देऊन नड्डा यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन देखील केलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचे भाजप स्वप्न भंगले आहे. राज्यातील एकूण 292 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 212 मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी या सत्ता स्थापन करीत आहेत. बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध ममतांची बंगाली अस्मिता अशी लढाई होती. अखेर ममतांची बंगाली अस्मिता भाजपवर भारी पडली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com