कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केंद्र सरकारला आव्हान दिले. कुटुंबीयांना केंद्र सरकारच्या एजन्सींकडून नोटीस मिळाली तर आम्ही कायदेशीररित्या लढा देऊ, असं ममता यांनी म्हटलं. (mamata banerjee news in Marathi)
कोळसा घोटाळ्यात सुरू असलेल्या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी ममता यांचे पुतणे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी बोलवले होते. त्यानंतर ममता यांनी कायदेशी लढा देण्यास तयार असल्याचं म्हटलं.
माझ्या कुटुंबाला (केंद्रीय संस्थांकडून) नोटीस मिळाल्यास, मी कायदेशीर लढा देईन. सध्याच्या काळात हे कठिण आहे. मात्र माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असंही ममता यांनी म्हटलं.
ममता म्हणाल्या, कोळसा घोटाळ्याचा पैसा कालीघाटात जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतो. पण त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. पैसे मां कालीकडे जात आहेत का? असा सवाल ममता यांनी केला. बॅनर्जी कोलकात्यातील कालीघाट परिसरात राहतात. हा परिसर काली मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. तसेच बेकायदेशीरपणे संपत्ती मिळवण्यात आपण कोणालाही मदत केली नसल्याचं ममता यांनी म्हटलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.