आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद
पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात आला आहे. सह्याद्री पट्ट्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वनविभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे धबधब्याचा प्रवाह जोरात असून पाण्यासोबत लहान-मोठे दगड वाहून येण्याची शक्यता आहे. हे दगड पर्यटकांच्या अंगावर कोसळून दुर्घटना घडू शकते. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यावर धबधबा पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे.