

Indore couple divorced in 7 days
ESakal
हिंदू परंपरेनुसार विवाह हे सात जन्मांपर्यंत टिकणारे एक पवित्र बंधन मानले जाते. मात्र मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातून एक असे प्रकरण समोर आले आहे. जिथे एका नवविवाहित जोडप्याचे लग्न केवळ सात दिवस म्हणजेच १६८ तास टिकले. या प्रकरणाची संवेदनशीलता आणि परिस्थिती लक्षात घेऊन इंदूर कुटुंब न्यायालयाने तात्काळ परस्पर संमतीने घटस्फोटाची याचिका मंजूर केली. दोन्ही जोडप्यांना विवाहाच्या बंधनातून मुक्त केले.