Raghuram Rajan: मोदी सरकार कौतुक करणाऱ्यांनाच मानते

भारतीय अर्थव्यवस्था जगातील इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत मजबूत
Raghuram Rajan: मोदी सरकार कौतुक करणाऱ्यांनाच मानते

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था जगातील इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत मजबूत आहे, मात्र रोजगाराच्या संधी नसल्यामुळे पुढील दहा वर्षांत समस्या वाढू शकतात.

ज्या दराने महागाई वाढत आहे, ते संकट आणखी गडद करू शकते. "आम्ही आराम करू शकत नाही. आपल्याला आणखी काम करण्याची गरज आहे. आपल्याला स्वतःमध्ये आणखी काही सुधारणा कराव्या लागतील. मोदी सरकार केवळ प्रशंसा करणार्‍यांनाच योग्य मानते, बाकीचे सर्व चुकीचे आहेत" असंही ते बोलताना म्हणालेत.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्था संकटातून जात आहे. कोविडमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आपला देश गरीब आहे. वर्षानुवर्षे ज्या प्रकारच्या नोकऱ्यांची गरज वाढली आहे त्यासाठी वाढ अपुरी आहे. माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, आपल्याला लोकांचे कौशल्य वाढवायचे आहे आणि शिक्षण क्षेत्राला गती द्यायची आहे. येत्या 10 वर्षात जे तरुण पदवीनंतर पदवीधर होतील, त्यांना स्किल बेस एज्युकेशन द्यावे लागेल, तरच नोकऱ्या वाढतील असंही ते म्हणालेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com