'मोदी सरकारच्या गब्बर टॅक्समुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला'

 modi government, gdp rahul gandhi, GST
modi government, gdp rahul gandhi, GST

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी देशाच्या  नकारात्मक जीडीपीवरुन (GDP) मोदी सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. मोदी सरकारच्या वस्तू आणि सेवा कर (GST) धोरणामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशातील अर्थव्यवस्थेच्या चिंताजनक परिस्थितीसंदर्भात राहुल गांधी यांनी रविवारी तिसरा व्हिडिओ शेअर केलाय. मोदीसरकारने GST च्या माध्यमातून छोटे आणि मध्यम व्यापारी , शेतकरी तसेच मजूर यांच्यावर आक्रमण केले, असा घणाघाती आरोप त्यांनी केलाय. 

देशाची अर्थव्यवस्था कोलमडण्यासाठी मोदी सरकारने लागू केलेला गब्बर टॅक्स मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. जीएसटीमुळे सर्वकाही उद्धवस्त झाले आहे. GST ही युपीए सरकारची कल्पना होती. सर्वसमावेशक एका टॅक्सच्या माध्यमातून सर्वांना दिलासा देण्याची योजना युपीए सरकारने आखली होती. मात्र मोदी सरकारचा जीएसटी खूपच वेगळा आहे. चार वेगवेगळ्या टॅक्सच्या माध्यमातून सरकारने यात गुंतागुत निर्माण केली. याचे परिणाम देशाला भोगावे लागत आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आह.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com