जलपायगुडी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ‘‘तृणमूल कॉंग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगोदर स्वत:ला आरशात पहावे. बंगालमध्ये विविध ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईवर श्वेतपत्रिका आणावी.’’ गेल्या काही महिन्यांपासून तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांविरुद्ध विविध आरोपाखाली ईडी आणि सीबीआय चौकशीचा फास आवळल्याने भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यात राजकीय संघर्ष पेटला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ममता बॅनर्जी यांची आज बंगालच्या जलपायगुडी जिल्ह्यातील मोईनागुरी येथे सभा होती. या सभेत त्यांनी नागरिकांना तृणमूल कॉंग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी भाजपबरोबरच कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांवरही टीकास्त्र सोडले. तृणमूल कॉंग्रेस राज्यात भाजपशी मुकाबला करत असताना माकप आणि कॉंग्रेसकडून मात्र त्यांना साथ दिली जात आहे, असा आरोप केला. भाजपने भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी तपास संस्थांचे ३०० पथके पाठविली. परंतु त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
आता मनरेगाच्या निधीचे काय झाले? याबाबत मोदी सरकारला उत्तर द्यावे लागेल. तपास यंत्रणांच्या कामाबाबतची श्वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी यावेळी केली. ‘‘गरीब जनतेने योजनेनुसार काम केले, मात्र त्यांना पैसे मिळाले नाहीत, असा दावा बॅनर्जी यांनी केला. मोदी म्हणतात, तृणमूल कॉंग्रेस हा भ्रष्ट पक्ष आहे. परंतु त्यांनी अगोदर आरशात स्वत:ला पाहावे. त्यांचा पक्ष दरोडेखोरांनी भरलेला आहे. भाजप हा बंगाली विरोधी पक्ष आहे. एनआरसीच्या नावाखाली आदिवासी, दलित आणि ओबीसींना बाहेर काढण्याची योजना आखली जात आहे आणि बंगालमध्ये एनआरसी लागू केला जाणार नाही,’’ असे त्या म्हणाल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.