कानपूर : अलीकडच्या काळात विचारसरणी किंवा राजकीय स्वार्थाची तुलना करावी लागते. समाज आणि देशाचे हित जोपासण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. विरोधी पक्ष कधी-कधी सरकारच्या कामकाजात अडथळे आणतात. कारण, ते सत्तेत असताना घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करू शकत नाहीत. आता हे निर्णय लागू केले तर विरोध करतात. देशातील जनतेला ते आवडत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.
समाजवादी पक्षाचे माजी राज्यसभा सदस्य हरमोहन सिंग यादव यांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (ता. २५) कानपूर येथे आयोजित चर्चासत्रात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना ते बोलत होते. विरोधकांवर (Opposition) विकासकामांमध्ये अडथळे आणल्याचा आरोप करीत कोणत्याही कोणत्याही पक्षाच्या व व्यक्तीच्या विरोधाचे देशाच्या विरोधामध्ये रूपांतर न करणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची जबाबदारी असल्याचे नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.
विचारधारांचे स्थान आहे आणि असले पाहिजे. राजकीय महत्त्वाकांक्षाही (Political interest) असू शकते. परंतु, देश प्रथम येतो. लोहियाजींचा असा विश्वास होता की समाजवाद हे समतेचे तत्त्व आहे. समाजवादाच्या पतनाने त्याचे विषमतेत रूपांतर होऊ शकते, असा इशारा ते देत असत. आम्ही भारतात या दोन्ही परिस्थिती पाहिल्या आहेत, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
आम्ही पाहिले आहे की भारताच्या मूळ कल्पना हा सामाजिक चर्चेचा विषय नाही. आपल्यासाठी समाज ही आपली सामूहिकता आणि सहकार्याची रचना आहे. समाज ही आपली संस्कृती आहे. संस्कृती हा आपला स्वभाव आहे. म्हणूनच लोहिया जी भारताच्या सांस्कृतिक क्षमतेबद्दल बोलत असत. त्यांनी रामायण मेळा सुरू करून आमचा वारसा आणि भावनिक ऐक्यासाठी मैदान तयार केले होते, असेही पंतप्रधान (Narendra Modi) म्हणाले.
दीर्घकाळापासून राजकारणात सक्रिय
हरमोहन सिंग यादव दीर्घकाळापासून राजकारणात सक्रिय आहे. त्यांनी विधान परिषद सदस्य, आमदार, राज्यसभा सदस्य आणि अखिल भारतीय यादव महासभेचे अध्यक्ष म्हणून विविध पदांवर काम केले आहे. हरमोहन सिंग यादव यांचे चौधरी चरण सिंग आणि राम मनोहर लोहिया यांच्याशी जवळचे संबंध होते. हरमोहन सिंग यादव यांच्यासह त्यांचे पुत्र आणि विधान परिषदेचे माजी अध्यक्ष सुखराम सिंह यांनीही कानपूर आणि आसपासच्या अनेक शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.