Nationwide Workers Strike : देशभरातील तब्बल ३० कोटी कामगार जाणार संपावर! ; ६०० जिल्ह्यांमधील कामं ठप्प होण्याची चिन्हं

Massive nationwide workers strike in India : जाणून घ्या, संपाची तारीख? आणि कोणत्या दोन राज्यांमध्ये या देशभव्यापी संपाचा सर्वाधिक परिणामा जाणवणार आहे?
Workers and trade union members participate in a nationwide strike protesting labour law reforms, bringing services to a halt across hundreds of districts in India.

Workers and trade union members participate in a nationwide strike protesting labour law reforms, bringing services to a halt across hundreds of districts in India.

esakal

Updated on

Nationwide Workers Strike Across India : देशभरातील ३० कोटींहून अधिक कामगार विविध मागण्यांसाठी संपावर जात आहेत. दहा केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त संघटनेने सोमवारी सांगितले की, १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी सार्वत्रिक संपाची हाक देण्यात आली आहे आणि देशभरातील किमान ३० कोटी कामगार या निषेधात सामील होण्याची अपेक्षा आहे.

केंद्र सरकारच्या "कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि देशविरोधी, कॉर्पोरेट समर्थक धोरणांचा" निषेध करण्यासाठी संघटनांच्या गटाने ९ जानेवारी २०२५ रोजी देशव्यापी संपाची हाक दिली होती.

या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या सरचिटणीस अमरजीत कौर यांनी माध्यमांना सांगितले की, १२ फेब्रुवारी, गुरुवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात किमान ३० कोटी कामगार सहभागी होतील. याआधी झालेल्या निषेधात सुमारे २५ कोटी कामगार सहभागी झाले होते. तसेच, देशभरातील ६०० जिल्ह्यांमध्ये या संपाचा परिणाम जाणवेल, जो गेल्या वर्षीच्या अंदाजे ५५० जिल्ह्यांपेक्षा जास्त आहे, असे त्यांनी सांगितले.

Workers and trade union members participate in a nationwide strike protesting labour law reforms, bringing services to a halt across hundreds of districts in India.
BJP win ZP, Panchayat Samiti Elections : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपच अव्वल!, निकालांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

कौर यांनी असेही सांगितले की, जिल्हा आणि ब्लॉक पातळीवर झालेल्या जोरदार तयारीवर कामगार संघटनांचे सहभागाचे दावे आधारित आहेत आणि शेतकरी तसेच इतर महासंघ देखील त्यांना पाठिंबा देत आहेत. आसाम आणि ओडिशामध्ये सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. तर भाजपशासित राज्यांमध्ये प्रस्तावित संपाच्या परिणामाबाबत, त्या म्हणाल्या की ओडिशा आणि आसाम पूर्णपणे बंद राहतील आणि इतर राज्यांमध्येही या आंदोलनाचा लक्षणीय परिणाम होईल.

Workers and trade union members participate in a nationwide strike protesting labour law reforms, bringing services to a halt across hundreds of districts in India.
Bawankule recalls Atalji's words : भाजपच्या घवघवीत यशानंतर बावनकुळेंनी अटलजींच्या 'त्या' वाक्याची करून दिली आठवण!

संयुक्त मंचाच्या निवेदनानुसार, संयुक्त किसान मोर्चाने त्यांच्या आणि कामगार संघटनांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ होणाऱ्या निदर्शने आणि एकत्रीकरणांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्याचप्रमाणे, कृषी कामगार संघटनांचा संयुक्त मोर्चा देखील या मोहिमेचा भाग आहे आणि मनरेगा पुनर्संचयित करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून संपात सामील होत आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com