Nehru Rejected Nepal Merger Proposal
esakal
Chandrashekhar Autobiography : गेल्या दोन दिवसांत नेपाळमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान ओली यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नेपाळमधील सरकार कोसळलं असून तिथे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. या घटनेनंतर भारत सरकारनेही निवदेन जारी करत नेपाळमधील भारतीयांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यानंतर भारत नेपाळ यांच्यातील संबंधांबाबतही चर्चा सुरु झाली आहे. नेहरुंनी जर नेपाळच्या तत्कालीन राजाचा प्रस्ताव स्विकारला असता, तर नेपाळ आज भारताचा भाग राहिला असता, असा दावाही केला जातो आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी त्यांच्या त्यांच्या आत्महचरित्रात याचा उल्लेख केला आहे.