भारतासोबत तणावानंतर आता पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारताने सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर आता मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. भारताने जम्मू-काश्मीरमधील जुन्या कालव्यांच्या पुनर्बांधणी आणि विस्तारकामाला सुरुवात करण्याचा निर्णय़ घेतलाय. यात कठुआ, न्यू प्रताप आणि रणबीर या कालव्यांचा समावेश आहे. १०० वर्षांपेक्षा अधिक काळानंतर पहिल्यांदा हे कालवे सुरू केले जातील.