रेल्वेच्या खासगीकरणाचा कसलाही विचार नाही; मोदी सरकारने केलं स्पष्ट

kokan railway
kokan railwaysakal

नवी दिल्ली : रेल्वेतील भरती प्रक्रिया बंद पडलेली नाही व कोरोनाकाळात आलेले डथळे दूर झाल्यावर गेल्या काही महिन्यांत रेल्वे भरती प्रक्रियेने वेग घेतला आहे, असा दावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत केला. रेल्वेच्या खासगीकरणाचा मोदी सरकारचा कोणताही विचार नाही असे सांगतानाच त्यांनी, बुलेट ट्रेनसारख्या जगातील अत्याधुनिक व नवनवीन तंत्रज्ञानाचा लाभ देशातील रेल्वे प्रवाशांना द्यायला हवा की नाही? असा सवाल विरोधकांना केला. (Indian Railway Privatization)

kokan railway
CBI चौकशीमुळे उंदीर सैरावैरा धावू लागलेत- चंद्रकांत पाटील

केंद्रीय अर्थसंकल्पातील रेल्वेविषयक चर्चेला उत्तर देताना रेल्वेमंत्री वैष्णव व विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात शाब्दिक चकमकी उडाल्या. हे (मोदी) सरकार यापूर्वीच्या सरकारांच्या काळातील चांगल्या कामांचा उल्लेखही करत नाही, श्रेय देणे तर दूरच असे सांगताना खर्गे यांनी, अशी भूमिका कायम ठेवणे देशहिताच्या दृष्टीने योग्य नाही असे सांगितले. भारतीय रेल्वेच्या विकासासाठी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह साऱ्याच माजी रेल्वेमंत्र्यांनी प्रयत्न केले. मात्र खर्गे यांच्या पक्षाच्या काळातच ‘टू-जी स्पेक्ट्रम' सारख्या प्रकल्पांचीच जास्त चर्चा होत असे, असे टीकास्त्र वैष्णव यांनी सोडले. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. खर्गे यांनी वैष्णव यांना प्रत्युत्तर देताना, माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी आताच केलेल्या भाषणात, माझ्या कार्यकाळात रेल्वेचे किती प्रकल्प मार्गी लागले हे सांगितले ते तुम्ही ऐकले नाहीत का? असा सवाल केला.

kokan railway
हायपरसॉनिक टेक्नॉलॉजीमध्ये भारत आघाडीवर, अमेरिकन खासदाराची कबुली

रेल्वे खासगीकरण व नोकरभरतीच्या मुद्यांवरूनही खर्गे यांनी सरकारला धारेवर धरले. या सरकारने एअर इंडियाचे खासगीकरण केले. आता गोरगरिबांचा आधार असलेली रेल्वे तरी खासगी करू नका, असे त्यांनी सांगितले. वैष्णव यांनी खासगीकरणाचा आरोप फेटाळल्यावरही खर्गे यांनी, हे सरकार रेल्वे खासगीकरणाच्या वाटेवर निश्चित निघाले आहे, असा टोला लगावला. रेल्वेत सध्या किमान २ लाख ६५ हजार पदे रिक्त आहेत. सव्वातीन लाखांहून जास्त कर्मचारी कंत्राटी सेवेवर आहेत असेही त्यांनी सांगितले. रेल्वेतील कर्मचारी भरती पूर्ण बंद असल्याचा आरोप वैष्णव यांनी फेटाळला. बुलेट ट्रेन प्रकल्प कासवगतीने सुरू असल्याचाही आक्षेप खरा नसल्याचे त्यांनी सांगितले व मुंबई-अहमदाबाद प्रकल्पही लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com